भारत
हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला आधिकारांमध्ये झुकते
माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित
करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात
पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी,
हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रिय सरकार तुलनेने सशक्त
ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटु नयेत यासाठी
केंद्रिय सरकारकडे जादा आधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील
स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशिर
झाला.
No comments:
Post a Comment